Tuesday, May 27, 2014

Mitti Ke Rang - at 'Gharate - NGO for street children - Hadapsar'

It is certainly well said that “The best and most beautiful things in the world cannot be seen or even touched. They must be felt with the heart.” And the same ecstasy was felt when we visited the “Gharte - NGO for street children -Hadapsar”.

We were touched by the extremely cheerful, generous and kind nature of the children.

- We played games with them.

- Taught CAPTAIN HAT's story and helped to make it. This I learn from Mr. Arvind Gupta's video on you tube.
This famous CAPTAIN'S HAT STORY is told while folding a newspaper. Fold a double newspaper and make several caps -- Umbrella cap, Fireman's cap, Shikari cap and a Policeman's cap. In the end you make a Ship. Unfortunately, the ship gets caught in a fierce storm. Huge waves hit the ship and knock it down. Finally the ship breaks into pieces and sinks. And all that Captain is left with is a LIFE JACKET.
Link @ http://www.youtube.com/watch?v=LY92PUCyphs

- We attained their evening prayer’ It was really pleasant to hear ‘Shubham karoti’ ( शुभंकरोती), Gayatri mantrs,(गायत्री मंत्र), Om Mantra.

- Then we distributed chocolates to them.

The children were really lovely and it was so hard to leave their beautiful smiling faces. 

One of our friend (Sagar) has a very heart touching experience when a girl called Anita came to him and asked him ‘Will you come to meet me daily ‘ (दादा, तुम्ही रोज येणार का मला भेटायला?’), he replied ‘Yes’ (‘हो’), then she asked ‘Promise me’ by putting her palm head. He was speechless !

So to bring smile on children face as you have to just spent time with them, play with them; they really make you feel special.





Monday, March 24, 2014

Smile on child face....

Saturday (22nd March, 2014) I went with my friend & his group for distribution of old/used cloths to needy person at Baba Jan Chowk, Camp and Pune Station.

At Baba Jan chowk, near dargah one litte girl was with her mother saw soft toys in one of our bag and asked for it so we gave her.

An innocent child that has absolutely nothing in this world, besides his body, mind, soul and... shadow, and still has one of the most sweet but yet wondering captivating genuine smiles in the world!

This little kid's smile made my day, I was wondering how a throw away toy made her a so happy , and I was seeing only her eyes and small face with true emotions!

She made me unleash and rediscover rejuvenated inner feelings, a huge relief and amazingly, made me smile in return!

So, I couldn't resist to such unspoiled purity and had to take her photo.

This poor child's smile was worth a thousand photos and no word to be said!



Tuesday, December 17, 2013

Bhuleshwar - Pune


Bhuleshwar




 Bhuleshwar, When I heard about this places while searching on net and after seeing photos of the shiva temple I inclined to visit this place. The  ancient temples having  beautiful carvings, sculptures always fascinate me .  so finally we went to see the temple on Sunday 1st Dec 13.


The temple is around 55 km from Pune towards Solapur road, near Yavat.
The temple is located on a hill and has been constructed by the Yadava rulers, in the 13th century. It was previously a fort called ‘Mangalgadh’. It is believed that temple was ruined by Muslim invaders and reconstructed later because the entrance of the temple is hidden like Gaimukhi Buruj construction of Shivaji's time. So when you see temple from outside, the temple tower resembles a tomb like Mughal architecture. But once inside, you can see a great influence of Southern architecture.


As per the mythological story it is the place where Devi Parvati danced for Lord Shiva and after they went to Kailas and get married. This place is crowded in Shrawan,Chaitra and Mahashivratri only.


There is amazing thing about this temple is that the offering (sweets like pedha) by devotee gets disappears whenever it is kept is small groove in front of main Shivalinga. The actor-travel writer Milind Gunaji has written about his experience with this in his book Mystical, Magical Maharashtra


The temple is located on hill, so landscape around the temple is immensely beautiful and breathtaking.

for more info.

visit : http://bhuleshwar.com/index.htm





View Larger Map

Sunday, February 03, 2013

अनाथांची माई - सिंधुताई सपकाळ

 दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

माई - सिंधुताई सपकाळ

स्व:ताची दु:खे बाजूला ठेवून अनाथ मुलांचे आयुष्य फुलवणाऱ्या माई चे जीवन खूपच प्रेरणादायी आहे.

जेमतेम ४ थी पर्यंत शिक्षण..शाळेत खाऊचा डबा नसायचा, तेव्हा इतर मुलांनी  डब्यातले सांडलेले अन्न फुले गोळा करायचे निमित्त करून खाणे .... वयाच्या ९ व्या वर्षी लग्न तेही ३५ वर्षे वयाच्या माणसासोबत ...सासरी शिक्षणाचा तिरस्कार ..सासुरवास ..१८ वर्ष पर्यंत ३ मुलं ...गावात बायकांनी गोळा केलेल्या गाई- म्हशीच्या शेणाच्या लिलावात बायकांना हिस्सा मिळावा म्हणून  केलेला संघर्ष ..त्यातून गावातल्या एकाने केलेल्या बदनामीमुळे वयाच्या २० व्या वर्षी ९ महिन्याची गरोदर असताना नवऱ्याने हाकलून दिले.. गाईच्या गोठयात  दिलेला मुलीला जन्म ...त्यानंतर जन्मदात्या आईनेही पाठ फिरवली ...जगण्यासाठी मागितलेली भिक ... रेल्वेत तान्ह्या मुलीला घेऊन गाणी गाऊन भाकरीचे तुकडे मिळवणे ... उघड्यावर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून स्मशानात काढलेले दिवस ... पोटातल्या भुकेसाठी प्रेताच्या अंत्यसंस्कारासाठी ठेवलेल पीठ आणि तिथेच ठेवलेल्या मडक्यातलं पाणी कालवून चितेवरच्या निखार्‍यावर भाजलेल्या कडक भाकरी खाणे ..आत्महत्तेचाही पर्यत्न... आणि इतके सोसूनही त्यांनी अनाथ, भिक मागणाऱ्या मुलांना जवळ केले, त्यांना माया, प्रेम दिले ..त्यांच्यासाठी भिक मागितली ..त्यांचे शिक्षण केले, त्यांना जगण्याची प्रेरणा दिली.

जवळ जवळ १ हजार पेक्षा जास्त मुलांच्या त्या आई बनल्या. आपल्या पोटच्या मुलीची माया अनाथ मुलांच्या सांभाळण्यात मध्ये येऊ नये म्हणून पोटच्या मुलीला अनाथ आश्रमांत ठेवले.

आजही माई अनाथ मुलांसाठी झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'
    'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. ' या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले ', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. " वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते ", माई सांगतात.

माई म्हणतात , ‘‘जगण्यासाठी, सोसण्यासाठीच बाईचा जन्म आहे. नीती, माती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालते, तिथे थकून उपयोग नाही. भूतकाळच वर्तमानाची वाट दाखवतो. "

" मुलांशी बापाचे नाते भीतीशी असते, तर आईचे नाते वेदनेशी असते"

"वेदना पदरात घेते ती आई असते. आई कधी खचत नाही, दुसर्‍याचे दुःख पदरात घेतले तर स्वतःचे दुःख हलके होते" या अनुभवाने त्यां आयुष्य जगल्या आहेत. अनाथ मुलांच्या वेदना पदरात घेऊन त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी माई आजही झटत असतात .

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्रित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.



अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित   "मी सिंधुताई सपकाळ" हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट "मी वनवासी" (नवरंग प्रकाशन)  या आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे.

माईंना आतापर्यंत २५८ राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.
माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,


निखार्‍यावरी दुर्दैवाच्या,
पडली चिमणी पिलं,
कवटाळूनी हृदयासी त्यांना मी
आईचं प्रेम दिलं,
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,
चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी..

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुणे - ४१२ ३०७
फोन. न. : ०२०-२६९९९५४१, ९३२६५३५२२४

संदर्भ :

Sunday, December 02, 2012

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१)

अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी होत. ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.

खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्‍यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदु:खांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.
बहिणाबाईंची कविता म्हणजे एका निरक्षर स्त्रीचं अक्षर वाङ्मय.

मन वढाय वढाय
मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा
न लहरी लहरी त्याले हाती धरे कोन? उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर!
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!

खोप्यावरी खोपा
[ सुगरण पक्ष्याची मादी झाडाला उलटं टांगलेले घरटे विणते त्याला उद्देशून ही कविता आहे.]
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???

अरे संसार संसार...
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर!
अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नहीं राऊळच्या कळसाले लोटा कधी म्हनु नहीं
अरे संसार संसार नहीं रडन कुढ़न येड्या, गयातला हार म्हनू नको रे लोढ़न!
अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एक तोंडामधि कडू, बाकी अवघा लागे गोड..
अरे संसार संसार, म्हनू नको रे भिलावा त्याले गोड भिमफूल, मधि गोडम्ब्याचा ठेवा.
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिकने सागरगोटे
ऐका, संसार संसार दोन्ही जीवाचा ईचार, देतो दु:खाले होकार, अन सुखाले नकार..
देखा संसार संसार, दोन्ही जीवाचा सुधार कधी नगद उधार सुखा दु:खाचा बेपार..
अरे संसार संसार असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार
असा संसार संसार आधी देवाचा ईसार माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार..!

कशाले काय म्हनू नाही
बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही
नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही
पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही
निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही
ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही
नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही
अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही
दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही
इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही
ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही

माझी माय सरसोती
माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आप०सुक हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!

इठ्ठल मंदीर
माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर
टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन
टायकर्‍यांचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभंग रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग चालली पावली जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली
शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं
आतां झाली परदक्षीना भूईले वंदन हेचि दान देगा देवा आवरलं भजन
आतां फिरली आरती भजन गेलं सरी बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी



अश्शि कश्शि येळि वो माये
अश्शि कश्शि येळि वो माये
अश्शि कश्शि येळि
बारा गाडे काजळ कुकु पुरलं नाही लेणं साती समिंदरच पानी पानी ज़ालं नाही न्हाणं
धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तुट आभायाच चोळी लुगडं लुगडं तेही ज़ालं थिटं
नशीबाचे नऊ गिर्हे काय काय तुज़्या लेखी गिर्हनाले खायीसनी कश्शि कश्शि गं ज़ाली सुखी
इडा पीडा संकटाले दिल्हा देहातुन ठाया देवा तुज़्या गया मधे त्या नररुंडाच्या माया
नऊ जनासी खाउ गेली सहज एक्या घोटी दहाव्याशी खाशी तवा कुटे राहील सर्वे सृष्टी
ब्रहमा इसनु रुद्रबाळ ख़्हेळीयले व्ह्टी कोमायात फ़ुटे पान्हा पान्हा गानं आलं वटी

घरोटदेवा, घरोट घरोट
तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट
घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट
वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे
त्याले म्हनवा घरोट
अरे, जोडतां तोडलं
त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ
त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट
माझा वाजे घरघर
घरघरींतून माले
माले ऐकूं येतो सूर
त्यांत आहे घरघर
येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर
त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा
दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं
कर त्याचं आतां पीठ
चाल घरोटा घरोटा
तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून
पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा
पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ
पडतं रे भूईवर
अरे, घरोटा घरोटा
तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा
दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा
घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं
कधीं देते बाजरीचा
माझा घरोट घरोट
दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ
त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा
माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात
अरे, घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां
जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा
तशी पाऊ तुझी झिजे
झिजिसनी झिजीसनी
झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये
टकारीन आली दारीं !

जीव
जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला' जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं? देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाच उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं

पेरनी
पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड!
पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी.

राजा शेतकरी
जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी
कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी
असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी
बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली
हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले
अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर
इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी मापबहिणाबाई चौधरी

म्हन
दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी
केसावार रुसली फनी एकदा तरी घाला माझी येनी
कर्‍याले गेली नवस आज निघाली आवस
आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही टाया पिटीसनी देव भेटत नही
पोटामधी घान, होटाले मलई मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई
तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला
मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा
मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर
डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली
वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही
म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आलीबहिणाबाई चौधरी.

- माणूस -
मानूस मानूस मतलबी रे मानसा,
तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा,
तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा गायम्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


'करमाची रेखा'ठळक मजकूर
(खालील कविता वैधव्य आल्यावर नशीबावर लिहिली)
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
गिऱ्हे = ग्रह

आदिमाया
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
बारा गाडे काजळ कुंकू
पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी
झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
धरतीवरलं चांदी सोनं
डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं
तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
इडा पिडा संकटाले
देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं
नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?
बरह्मा इस्नू रुद्र बाळ
खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा
गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नशीबाचे नऊ गिर्‍हे
काय तुझ्या लेखीं?
गिर्‍ह्यानाले खाईसनी
कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नऊ झनासी खाउन गेली
सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां
कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

Monday, September 17, 2012

मृत्युंजयकार शिवाजी सावंत

मृत्युंजयकार शिवाजी सावंत
( जन्म : ३१ ऑगस्ट १९४० , मृत्यू : १८ सप्टेंबर २००२)
जन्मगाव : आजरा, जि. कोल्हापूर

त्यांच्या पहिल्याच 'मृत्युंजय' या कादंबरीला प्रचंड  लोकप्रियता लाभली आणि त्यांना 'मृत्युंजयकार' हि उपाधी मिळाली.
'मृत्युंजय' ची कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, हिंदी व राजस्थानी भाषेतहि भाषांतरित झाली आहे.
आजही  'मृत्युंजय' ची लोकप्रियता कमी झालेली नाही.

प्रकाशीत साहित्य :-
१. मृत्युंजय  ( महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील कादंबरी, १९६७ )
२.  छावा ( छत्रपती संभाजींच्या जीवनावरील कादंबरी, १९६९)
३. युगंधर (श्रीकृष्ण चरित्रावरील कादंबरी, २०००)
४. लढत ( पदमश्री  विखे पाटील यांच्या जीवनावरील कादंबरी, १९८५)
 ५. अशी मने असे नमूने
६. मोरावळा
७. संघर्ष ( कामगारनेते भाई कोतवाल यांच्या जीवनावर )
८. शेलका साज
९ . कवडसे

"...मंदिराच्या माथ्यावर पाषाणाच्या निरुंद फटीत उगवलेलं ते पिप्पलाच रोपट बघ ! आपली लुशलुशीत  लाल पान हलवून सांगत आहे कि, या पाषाणाच्या माथ्यावर पाय देवूनही मला जगायचं आहे ! वायुबरोबर डुलायाचं  आहे ! प्रतिकुलतेच्या पाषाणाला एक साधसं रोपटेसुद्धा शरण जायला तयार होत नाही आणि मानव मात्र ..."
                                                    -- 'मृत्युंजय' मधून

"...जे जीवन मिळवण्याचा अधिकार नाही, ते गमावण्याचाही अधिकार नाही. आत्महत्या म्हणजे भावनाविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार होय ! ... अशांनी सहनशील धरती कडे पाहावे. तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची शक्ती वाढवावी. शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आत्मिक आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होवून जावे कारण कुणीही कधीही विसरू नये कि काळ अखंड आहे ....जीवन हि भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू राहणारा अखंड प्रवास आहे ...."
                                               -- 'मृत्युंजय' मधून

Monday, June 25, 2012

Ramdara ( Near LoniKalbhor)



 Ramdara( Near LoniKalbhor)

Ramdara Temple is an old temple with idols of many deities. The main shrine is that of Shiva, but the statue is famous for the idols of Ram, Lakshman and Sita. There is an ashram of Shri Devipuri Maharaj also known as Dhundi baba. There is a small pond next to the temple. The location of the temple along with the abundance of trees in the vicinity makes this place very calm and beautiful.

How to reach:

  1. Start from Swargate and take Solapur highway.
  2. Cross Hadapsar, Manjri etc. Travel straight till you reach “Loni Kalbhor” Toll plaza.
  3. As soon as you cross Toll plaza, you will have to cross a bridge.
  4. After crossing this bridge, you will see a fade “Ramdara” sign board on left hand side showing to turn to right side. Take immediate right turn to go to Loni kalbhor village.
  5. After distance of 2 mins drive, we will get a small chowk. Take again right turn from there. (You may ask local people)
  6. The landscape changes a lot within this 7 km and the latter part is kms of emptiness on either side of the road. You don’t see temple until the last minute as it is hidden within few hills and the last turn will take you to a big parking lot covered by trees

It is also good bird watchers. To watch birds you have to reach there early morning around 6:00 am.
Birds you can see – Sunbirds, Baya weavers, Red wattled lapwings, Drongos, Small bee-eaters, Ioras, Mynas, Bulbuls, and Doves.

One can combine Theur (The Chintamani Temple of Theur - one of the Ashtavinayaka temples,)  with Ramdara temple visit as well.




View Larger Map

Saturday, June 02, 2012

लेखिका आनंदीबाई शिर्के ( ३ जुन १८९२ – ३१ ऑक्टोबर १९८६)

लेखिका आनंदीबाई शिर्के ( ३ जुन १८९२ – ३१ ऑक्टोबर १९८६)


जुन्याकाळातील एक मान्यवर लेखिका,
‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध.
आनंदीबाईंनी या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.

http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/20100924/5533642552184932574.htm


स्वागताध्यक्षा, अखिल भारतीय साहित्य संमेलन (जळगाव, १९३५).

कथासंग्रह :-
'कथाकुंज' (१९२८)
'कुंजविकास' (१९३४)
'जुईच्या कळ्या' ( १९३९)

कथा :-
'भावनांचे खेळ आणि इतर गोष्टी' ( १९४३)
'साखरपुडा' (१९६४)
' तरून पुष्पे' ( १९५८)
'गुलाबजाम' ( १९८१)

आत्मचरित्र :-
सांजवात (१९७२)


कादंबरी:-
'रुपाळी'

बालकथा संग्रह :-
'कुरूप राजकन्या'
'तेरावी कळ व इतर गोष्टी'
वाघाची मावशी व इतर गोष्टी'




Saturday, April 14, 2012

One day trip (Tulapur and Phulgaon)


Tulapur, about 40 km from Pune, Pune-Nagar road .Reaching to Tulapur was not much difficult as one has to drive towards nagar, after Wagholi, Lonikand you will get Phulgaon subway. After taking turn one abot 15 mins of drive after Phulgaon you will reach to Tulapur. It is situated at a place where three rivers. Bheema Bhama and Indrayani meet.
Tualpur and Phulgaon are the good places to visit in a day, which are having historical background and are blessed with nature beauty.

A brief about history :

Tulapur mainly known for load shiva temple called ‘Sangmeshwar’ and shrine of Shri Sambhaji Maharaj, the son of Great Shivaji Maharaj.
Tulapur originally known as ‘Nagargaon’ . The Murarpant Jagdev, the one of the important name in the Adilshah’s court. Once he had developed white rashes one his face and limbs. So he went to Nagargaon to meet a sage  Swami Rudranath Maharaj. Under the treatment of Rudranath Maharaj, Murarpant got cured. Murarpant  offer some ‘Dakshina’ to Rudranath Maharaj in form of gold, silver and grains. But Rudranath Maharaj told him to donate this in poor people and also rebuild the shri Sangameshwar temple.
Murarpath immediately followed his order. He donated gold, silver, grains etc. almost 24 items among the poor with the tula of himself (each item worth weight of Murarpant) . Even he donated the gold ‘tula’ of about elephant’s weight. (gold worth weight of elephant) As tula was done on that day Nagargaon to be known as ‘Tulapur’
‘Tula’ in Sanskrit means to weigh and ‘Pur’ means a town.


Shri Chhatrapati Sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj was brutally murdered at Tulapur by Aurangzeb.
Sambhaji’s was tortured to change his religion but Sambhaji raje refused.  failing to which he was killed in a brutal way. His eyes were burned off with hot iron rods and tongue was plucked. Skin was peeled off and body parts were cut. Kavi Kailash was also put to death with Sambhaji raje on 11th March 1689. The Samadhi of Sambhaji raje is situated here.

You will see following  places at Tulapur


 
1. A beautiful temple of Lord Shiva ( Sangmeshwar )








2. Samadhi of Sambhaji Raje 






3. The beautiful sangam of tree rivers ( Bheema, 
 Bhama & Indrayani). Boating facility is also there.



For more information visit: www.Tulapur.com



Phulgaon :
Phulgaon is also very nice place visit along with Tulapur.
It is situated on bank of river Bhima. It is beautiful place where you will see Kamani Ghat, it is very nice. Bajirao Peshave used to come here. There is south face (‘Dakshinmukhi’) Shani mandir.

Phulgaon has Shrutisagar Ashram, established in 1989 by Swami Swaroopanand Saraswati. It has a unique temple of Dakshinamurthy. Here one can find detailed explanations of śruti and smrti (including the Vedas, Bhagwat Gita, Upanishads and Puranas) in Marathi and English.
For more information visit : http://www.shrutisagarashram.org/
Phulgaon is also famous for education, it has a oldest school in India, started by Dhotre family in 1860.

Wednesday, April 11, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 12 April

वासुदेव गोविंद आपटे (एप्रिल १२, १८७१; - फेब्रुवारी २, १९३०)
मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार
जन्मगाव  : धरणगाव, खानदेश, महाराष्ट्र

Wikipedia Link वासुदेव गोविंद आपटे

पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०)
मराठी लेखक.
 १७ कादंबऱ्या, २६ कथासंग्रह, ८ नाटके, १२ लेखसंग्रह, २ पटकथा इतके  लेखन त्यांनी केले.
 अध्यक्ष,  ( मराठी साहित्य संमेलन, पुणे, १९७७)

Wikipedia Link पुरुषोत्तम भास्कर भावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम येथील लेख

Monday, April 09, 2012

श्रीधर व्यंकटेश केतकर : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७)

श्रीधर व्यंकटेश केतकर : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७). महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते, समाजशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, कादंबरीकार व विचारवंत.
जन्मगाव : रायपुर, मध्यप्रदेश
अध्यक्ष ( महाराष्ट्र साहित्य संमेलन १९३१ )

 Link : मराठी विश्वकोश : केतकर, श्रीधर व्यंकटेश
 
महाराष्ट्र टाईम्स लेख  :  ज्ञानकोशकार श्रीधर केतकर 

लोकसत्ता लेख  : ‘ज्ञानकोशा’चा वारसा विसरू नका...

 

काही वाचनीय लेख (8 April, 12)

काही वाचनीय लेख :-

एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस' (उत्तम कांबळे)
एम्प्लॉयमेंट चौकात कामासाठी मजूर मिळत नाहीत हे थोडं विचित्रच वाटत होतं. टपरीवाल्याशी बरंच बोलावं असं वाटत होतं; पण तो खूपच बिझी होता. स्टोव्ह, चहाची किटली, ग्लास याबरोबर झुंजत होता. एकटाच होता. केटी, कट, स्पेशल यांसारख्या चहाची ऑर्डर सुरूच होती. बिनसाखरेचा चहा घेऊन मी निघालो.
(संदर्भ : सकाळ ) Link : एम्प्लॉयमेंट चौकात 'सेल्फ सर्व्हिस'


शब्दारण्य :देव देव्हाऱ्यात नाही... (नीरजा )
माणसं दिवसेंदिवस अंधश्रद्धेकडे झुकू लागली आहेत. त्याचा फायदा व्यापारी मनोवृत्तीचे लोक नेमका उठवताहेत. मध्यंतरी ‘देऊळ’सारखा चित्रपट आला. माणसानं केलेल्या श्रद्धेच्या बाजारीकरणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटानं जी मंडळी विचार करत होती, तीच कदाचित अस्वस्थ झाली असावीत. पण जे या बाजाराचा भाग होऊन जगताहेत त्यांचं काय? सिद्धीविनायकासमोरच्या तरुण पिढीच्या रांगा कमी झाल्या का? लालबागच्या राजावर होणाऱ्या पैशाच्या पावसाचे प्रमाण कमी झाले का? अर्धा भारत दारिद्रय़ात जगतो आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांना कोणतीही मदत जात नाही. पण देवस्थानासमोरच्या पैशांच्या आणि सोन्याच्या राशी मात्र वाढतच चालल्या आहेत. हे कशाचं द्योतक आहे?
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  देव देव्हाऱ्यात नाही..

मॉल कॉम्प्लेक्स ( शफाअत खान )
‘मॉल कॉम्प्लेक्स’मुळे अनेक कुटुंबांत भयंकर अडचणी निर्माण झाल्या. मॉलमधून मॉल कॉम्प्लेक्सचे असंख्य बळी सामानाने खचाखच भरलेल्या अनेक पिशव्या घेऊन रस्त्यावर येत होते. ते आनंदाच्या भाराने वाकले होते. थकले होते. आतल्या आत जांभया देत होते. काहींना उगाचच अडचणी संपल्या असं वाटून हसू येत होतं. काहीजण आता खऱ्या अडचणी सुरू झाल्या असं समजून धास्तावून गेले होते. असो!
.. पुन्हा पुढच्या आठवडय़ात ही माणसं रांगा लावून मॉलमध्ये शिरतील. गंडाने पछाडतील. स्वत:ला गंडवून, त्रासवून घेतील.

(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  मॉल कॉम्प्लेक्स

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार ( डॉ. गिरीश कुलकर्णी )
आज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
(संदर्भ : लोकसत्ता ) Link :  सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार






Sunday, April 08, 2012

शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१)

शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१)
जन्म गाव: आटपाडी, जि. सांगली.
मराठी लेखक, कादंबरीकार .
मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरूही.

http://mr.wikipedia.org/wiki/शंकरराव_खरात

 http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=310&Itemid=93

 वेशीबाहेरचा कुलगुरू - शंकरराव खरात  (महाराष्ट्र टाइम्स )



Monday, April 02, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 3 April

द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ नाथमाधव (एप्रिल ३, १८८२ - जून २१, १९२८)
मराठी लेखक.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या काही मोजक्या साहित्यिकांनी आपल्या लेखणीचे एक वेगळेच दर्शन वाचकांना घडवले त्यापैकी एक म्हणजे नाथमाधव.

ऐतिहासिक विषयांवरील त्यांच्या कादंबर्या विशेष गाजल्या.

Sunday, April 01, 2012

पुस्तक परिचय ( ०१ एप्रिल, २०१२)

कर्करोगाशी दिलेल्या यशस्वी झुंजीची कथा
कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन त्यावर मात केलेल्या डॉ. गीता वडनप यांच्या पुस्तकाचा परिचय.
पुस्तकाचे नाव "लढले मी अन्‌ जिंकले मी...ब्लडकॅन्सरशी दिलेली झुंज'
लेखिका - डॉ.गीता वडनप,
प्रकाशक - राजहंस पकाशन,
मूल्य -130 रुपये

मधू मंगेश यांच्या साहित्याचा चिकित्सक वेध 
पुस्तकाचे नाव - मधू मंगेश कर्णिक  व्यक्तिमत्त्व आणि वाङ्‌मयीन कर्तृत्व
लेखक - डॉ. महेश खरात
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
मूल्य - 280 रुपये.

सुरक्षेच्या प्रश्‍नाचे अंतरंग 
पुस्तकाचे नाव - अंडरस्टॅंडिंग नॅशनल सिक्‍युरिटी
लेखक - सिद्धार्थ जोशी
प्रकाशक - फ्लायवेल पब्लिकेशन्स
मूल्य - 495 रुपये

तीनही पुस्तकाचा परिचय
http://www.esakal.com/esakal/20120401/5119990003369682560.htm
(संदर्भ : सकाळ )

टॅपेस्ट्रीच्या अंतरंगात

मूळचे कोकणातले असलेले, पण आता जपानमध्ये स्थायिक झालेले जागतिक ख्यातीचे टॅपेस्ट्री चित्रकार प्रभाकर नाईक साटम यांचं भन्नाट आत्मचरित्र.
maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482969.cms
पुस्तकाचे नाव - झल्लाळ
लेखक - प्रभाकर नाईक साटम
प्रकाशक - अनुभव अक्षरधन
मूल्य -
(संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स   )


लष्करी हुकुमशाहीशी अहिंसेच्या मार्गाने लढा देणाऱ्या स्त्री चि कहाणी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=377&Itemid=378
पुस्तकाचे नाव - राजबंदिनी ( आँग सान स्यू ची हिचं चरित्र )
लेखिका- प्रभा नवांगुळ
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
मूल्य : २५० रुपये.
(संदर्भ : लोकसत्ता)


तुकड्या तुकड्यात विखुरलेलं आजचं वास्तव
नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482949.cms
पुस्तकाचे नाव - फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
लेखिक - जयंत पवार
प्रका
शक - लोकवाङ्मय गृह
मूल्य : २०० रुपये.
(संदर्भ : लोकसत्ता)

वास्तवाचा अचूक वापर
 ' अस्तित्वाचे धागे' ही प्रा. प्रकाश खरात यांची आत्मपर कादंबरी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482924.cms
पुस्तकाचे नाव - अस्तित्वाचे धागे'
लेखक - प्रकाश खरात
प्रकाशक - मैत्रेय प्रकाशन
मूल्य : १५० रुपये
(संदर्भ : लोकसत्ता)

पुस्तक परिचय ( ०१ एप्रिल, २०१२)




Thursday, March 29, 2012

Dinvishesh : दिनविशेष - 30 March


वसंत आबाजी डहाके (मार्च ३० १९४२ -हयात )

मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.
जन्मगाव : बेलोरा, जि. यवतमाळ
अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन ( फेब्रुवारी २०१२, चंद्रपूर)
 http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87

कविवर्य वासुदेव गोविंद मायदेव (वा. गो. मायदेव जन्म - जन्म २६ जुलै १८९४, मृत्यू ३० मार्च १९६९)

गंभीर विचारवृत्तीच्या, बालांसाठीच्या कविता मायदेव यांनी लिहिल्या.
http://www.manogat.com/node/19576

चित्रकार ( 30 March )

एस. एम. पंडित ( जन्म : मार्च २५, १९१६, गुलबर्गा, कर्नाटक, मृत्यू : मार्च ३०, १९९३ मुंबई, महाराष्ट्र)
ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरची त्यांची चित्रे विशेष गाजली. त्यांनी रामायण-महाभारतील दृश्य, शाकुंतल सारख्या पौराणिक कथा, रंभा, उर्वशी  या विषयांवर चित्रे काढली आणि ती विशेष गाजली. राम-सीता हे त्यांचे खूप गाजलेले चित्र. विवेकानंद, इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांची चित्रेही त्यांनी काढली.
त्यांची माहीती आणि चित्रे : http://smpanditji.blogspot.in/
त्याच्या विषयी माहिती ‘ महाराष्ट्रातील कलावंत आदरणीय आणि संस्मरणीय ‘ ( बाबुराव सडवेलकर, ज्योस्त्ना प्रकाशन ) या पुस्तकातही आहे.

चित्रकार रंगसम्राट रघुवीर शंकर मूळगावकर (नोव्हेंबर १४, १९१८ - मार्च ३०, १९७६)
अनेक साहित्याकांच्या ( प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी ) पुस्काची मुखपृष्ठे, नियतकालिकांची (दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण इ.)व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्यातून साकारली.
श्रावण सरीभाग - १ : रंगसम्राट मुळगावकरांच्या निमित्ताने..

व्हिन्सेंट व्हॅन गॉग ( ३० मार्च, १८५३ – २९ जुलै, १८९० )

आपल्या वेगळ्या शैलीने चित्रकलेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात चित्रकार. जगातील सर्वोत्तम, सर्वाधिक लोकप्रिय आणि महागड्या कलाकृतींमध्ये व्हिन्सेंट च्या कलाकृतीचा समावेश होतो.

आयवर्हिंग स्टोनच्या व्हॅन गॉगवरील लस्ट फॉर लाईफया कादंबरीचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे.  
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉग
मूळ लेखक : आयर्विंग स्टोन  
अनुवादक : माधुरी पुरंदरे  
प्रकाशन : पुरंदरे प्रकाशन 

व्हिन्सेंट व्हॅन गॉ च्या वहिनी जोहान्ना व्हॅन गॉ यांनी लिहिलेल्या आठवणींचे मराठी हृदयांतर अनिल कुसुरकर यांनी केले आहे.
पुस्तकाचे नाव : व्हिन्सेंट व्हान गॉच्या आठवणी
मूळ लेखक : जोहान्ना गॉ (व्हिन्सेंट व्हान गॉचि वाहिनी )    
अनुवादक : अनिल कुसुरकर    
प्रकाशन : ग्रंथाली

स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया (३० मार्च, १७४६-  १६ एप्रिल, १८२८)